Saturday, June 23, 2012

पाऊस दोघांतला

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...

Tuesday, June 12, 2012

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

Wednesday, June 6, 2012

पहिला पाऊस




दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही... 

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला... 

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

Tuesday, June 5, 2012

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....