Tuesday, June 12, 2012

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

Wednesday, June 6, 2012

पहिला पाऊस




दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही... 

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला... 

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

Tuesday, June 5, 2012

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

Saturday, May 26, 2012

आली लग्न घटी समीप


सनईच्या सुरावटीनं विवाह मंडप भरून गेलेला...
लग्नघटिका समीप येऊन ठेपलेली...
उपस्थित आप्तेष्ट, जिवलग, नातलग, सगेसोयरे हातात फुलपाकळ्या, अक्षता घेऊन मंत्रोच्चाराच्या प्रतीक्षेत...
करवल्यांची गडबड... मामा मंडळींची धावपळ...
सजलेल्या लग्नवेदीवरील फुललेले हार तिला भेटण्यास आतूर...
तो येऊन उभा... जन्माची गाठ बांधण्यास उत्सुक... मुंडावळ्यांआडून तिची चाहूल शोधणारा...

..ती...
गौरीहारासमोर बसलेली...
लग्नघटिका जवळ येईतो "नवे' पाऊल टाकण्यास उत्सुक असलेली...
प्रत्यक्ष पाऊल टाकण्याचा क्षण खुणावू लागल्याने मागे-मागे रेंगाळणारी...
गौरीहारावर पुनःपुन्हा हळदी-कुंकू वाहत "तो' क्षण लांबवू पाहणारी....
पुरोहितांचे बोलावणे कानावर पडताच.... भरल्या मनाने... हळुवार पावलांनी विवाहवेदीकडे जाण्यास निघणारी
त्याक्षणी युगायुगाचे वाटणारे हे अंतर... मनाशी कल्लोळ पेलत कमी करणारी...

...नेमका असाच ऊर घुसमटणारा कल्लोळ तिच्या जन्मदात्यांच्याही मनी
तिला फुलापरी जपणाऱ्या तिच्या दादा आणि सखी म्हणून मिरविणाऱ्या ताईच्याही हृदयी...

ती...
माझ्या मायेच्या अंगणाची सय आज संपणार...
जेथे भातुकलीचा खेळ मांडला... दादा-ताईसोबत भांडून... मी हरलेला प्रत्येक डाव जिंकला...
जेथे माझी पावलं आई-बाबांचे बोट धरून उभी राहिली... नंतर दुडदुडली आणि मग मुक्तपणे पडली...
ते अंगण माझ्यासाठी अनोळखी होणार...
माझ्या बोटाला धरून ज्यांनी माझं पहिलं पाऊल साजरं केलं... माझ्या पावलांना बळ दिलं...
माझ्या ओठी मायेचा घास भरवत लहानाचं मोठं केलं...
संस्कारांच्या शिदोरीने माझं मन तुडुंब भरलं...
कधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरविला माझा हट्ट...
चुकल्यावर काहीसं रागे भरून... पण नंतर पाठीवरून मायेचा हात फिरवून मला समजावलं...
माझ्या पंखांत बळ भरलं...
जगण्याशी दोन हात करण्यासाठी खंबीर बनवलं...
प्रत्येक हळवे क्षण जपले...
स्वतंत्र ओळख रुजविण्यासाठी धडपडले...
माझ्या सुखमय भविष्यासाठी दुरावा लाभणार असूनही चेहऱ्यावर हास्य दाखवून दुःख ठेवलं पोटात... खोलवर...
माझ्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही झिजवलं...
कमीपणा घेण्यातही नाही मानला कमीपणा...
त्या आई-बाबांसोबत अंतर आता पडणार....
...घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दुरावणार...
या भिंतींच्या साक्षीने जगलेल्या त्या सर्व क्षणांना पारखी होणार... गोड गुपितं... माझे सवंगडी... माझ्या सख्या... माझे सोबती... माझी हक्काची ठिकाणं... छोटे छोटे आनंदाचे क्षण... लुटूपुटूची भांडणं... रागावणं... रडणं... ओरडणं... खळाळून हसणं... टाळ्या पिटणं... सारं सारं इथंच राहणार...
...आपलं माहेरपण सुरू होणार...!

आई...
जन्माला आली तेव्हा वाटलं प्रतरूपच आलं पोटी...
हाताचा झोका करून वाढवताना...
बोबडे बोल ऐकताना...
बाळमुठी वळताना... प्रत्येक पाऊल सावरताना...
बाललीला अनुभवताना... छातीशी बिलगून घेता-घेता... ती कधी माझी सावली बनली समजलंच नाही...
छोटी पावलं मोठी झाली... आकाश तिचं विस्तारलं...
अंगणातली तिची भातुकली सावरताना आठवणींची रांगोळी आपसुक सजली...
डोळ्यासमोर राहिले उभे आयुष्यातले ते साठवले क्षण
तिचं शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं... आणि शाळा सुटल्यानंतर येऊन घट्ट बिलगणं...
शाळेतलं यश साजरं करणं आणि छोट्या छोट्या हातांनी स्वयंपाकघरातलं लुडबुडणं...
वाढत्या वयाबरोबर तिचं प्रगल्भ होणं आणि माझा त्रास कमी करण्यासाठी सतत धडपडणं...
अडचणींत माझ्यासह घर सावरणं...
लाघवी बोलण्यानं माणूस-माणूस जोडणं...
अडचणीतून मार्ग काढताना खंबीर उभं राहणं...
"आई मी आहे गं!' हे आधाराचे शब्द बोलणं आणि सावली बनूनच पुढं... पुढं जाणं...
कधी रुसणं... कधी फुगणं... पण माझ्या संस्कारांना जागून माझं नाव राखण्यासाठी धडपडणं...
मैत्रीण, माझी सखीच ती...
बोलली नाही कधी उलटे, की बोलली नाही कधी लागट...
सावरलं... मलाच समजावलं... जेव्हा कधी आली अडचण...
घराचं घरपण सर्वांनी टिकवायचं असतं... जाणून घेतलं तिनं...
जन्मली तेव्हाच होतं ठाऊक...
कधी ना कधी दुरावणार हे परक्‍याचं धन...
आता आली वेळ... घटका-पळे भरतील..."...सावधान' म्हटले जाईल...
...माझी ही वेल तिच्या हक्काच्या अंगणी रुजण्या सप्तपदी चालेल....
पावले ती टाकेल सात... आणि... मी शोधत राहीन... तिची माझ्या आयुष्यातून निसटून चाललेली पाऊलवाट...!

बाबा... 
पाहू या - करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला "तो' सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटींनी भारला सारा भवताल.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा,
तुझा पहिला मृदू सहवास...
लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश...
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन लुटलेला बापपणाचा आनंद...
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण...
कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून
मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप...
कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं... आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌...
"बाबाऽऽ म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...
खरं सांगतो पोरी,
तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण... धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..! 

Sunday, May 6, 2012

दिल को लग गयी...


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने

दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल? तसं केलं तर कसं होईल?...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का? या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
पहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या "स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.
त्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.
हे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.
एरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे? त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.
चला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी...