Saturday, December 29, 2012

चप्पल

मूर्तीला नमस्कार करून तो मंदिरातून बाहेर पडला. देवाचं नामस्मरण करत तो बाहेर पायऱ्यांवरच एका बाजूला काही वेळ तसाच बसून राहिला. काही वेळाने उठला. पुन्हा एकदा मूर्तीकडे पाहून त्याने नमस्कार केला आणि चप्पल घालण्यासाठी तो स्टॅंडजवळ आला तर ठेवल्या जागी त्याला त्याची चप्पलच दिसेना... तो अस्वस्थ झाला. अस्वस्थपणेच त्यानं सगळं चप्पल स्टॅंड तीन-तीनदा पाहिलं; मात्र चप्पल काही त्याला सापडली नाही. मघाशी देवाचं नामस्मरण करणारा तो अस्वस्थपणे आता मनातल्या मनात चप्पल नेणाऱ्याला "लाखोली' वाहू लागला. महिनाच झाला होता चप्पल घेऊन... आता पुन्हा भुर्दंड... एकदा चप्पल घेताना शंभरदा विचार करतो आम्ही आणि नेणारा... त्यानं पुढची वाक्‍ये मनातल्या मनात उच्चारली आणि दोन शिव्याही हासडल्या... वैतागून तो पुन्हा पायरीवर जाऊन बसला...काही वेळ गेला. मनाशी काही तरी ठरवून उठला. इकडं तिकडं बघत... त्यानं त्यातल्या त्यात बरी चप्पल पायात सरकवली आणि देवाकडं पाठ करून तो मंदिरातून बाहेर पडला. 

पायऱ्या चढून घरात येता-येता, चप्पल काढतच त्याने झाली हकीकत "कुटुंबा'ला सांगितली. 
त्याच्या पायाकडं पाहत त्याचं कुटुंब म्हणालं, "हे बरं झालं बाई, काहीतरी पायात घालून आलात ते! नाहीतर नेहमीप्रमाणे मंदिरात चप्पल गेली की पायात काहीही न घालता आला असता म्हणजे उद्या पहिली चप्पल खरेदी करावी लागली असती.'' 

तिचं ते बोलणं बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं नसावं. तो कपडे काढून बेडवर आडवा झाला आणि चप्पल गेल्याचा विचार करू लागला. नेणाऱ्याला माझीच चप्पल दिसली काय? जरा नवी दिसली की घातली पायात. माणसांनी पुरती लाजच सोडली आहे. चपला पण सोडत नाहीत... अरे एखाद्याची ऐपत नसेल तर त्यानं काय अनवाणी फिरायचं? काय सालं जिंदगी...' तो चप्पलच्या विचारांतून बाहेरच यायला तयार नव्हता. एवढ्यात कुटुंब म्हणालं, "अहो तुम्ही ज्याची चप्पल घालून आलात तो बसला असेल की शोधत.'' 

झालं. तिच्या या वाक्‍यासरशी त्याच्या विचारांनी एकदम यु टर्न घेतला. अरेच्चा हा विचार मी केलाच नाही. मघाशी आवेगात चप्पल घालून आलो खरा पण, यापूर्वी मी जे अनुभवलं तोच अनुभव माझ्यामुळे एखाद्यावर येणार...आता तो आणखी अस्वस्थ झाला. त्याला आता अपराध्यासारखं वाटू लागलं. "माझी चप्पल गेली जाऊ दे... पण आपण दुसऱ्याची चप्पल घालून यायलां नको होतं. मी उद्या दुसरी चप्पल घेऊ शकतो; पण ज्याची चप्पल मी घालून आलो त्याची जर ऐपत नसेल तर... हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. भावनेच्या भरात घातली चप्पल आणि आलो घरी. का मी भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. काय अवदसा आठवली मला... विचारांचा भुंगा त्याला पोखरू लागला आणि त्याच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडू लागली... 

त्याच अस्वस्थतेत त्यानं दिवसभर ऑफिसात काम केलं. पायातली चप्पल त्याला मनात टोचत राहिली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं. काम संपवून तो घरी आला... फ्रेश झाला. त्यानं पुन्हा "ती' चप्पल अडकवली आणि तडक मंदिर गाठलं. जेथून त्यानं "ती' चप्पल पायात सरकवली होती तिथंच ती काढून ठेवली. चप्पल पायातून काढताच त्याला एकदम हलकं-हलकं वाटू लागलं. डोक्‍यावरचं ओझं उतरल्याचं समाधान त्याला मिळालं. तो पुन्हा मंदिरात गेला. मूर्तीपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याच्या मनावरील मळभही बऱ्यापैकी दूर झालं. चप्पल कोणाची का असेना, आपण पुन्हा जागेवर आणून ठेवली. ज्याची आहे तो कदाचित चप्पल शोधण्यासाठी येईल आणि त्याला ती मिळूनही जाईल; पण आता किमान ती माझ्याकडे तरी नाही याचं समाधान. हा विचार करतच तो बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला. आता पोखरणाऱ्या भुंग्याने त्याची पाठ सोडली होती. चप्पल हरवल्याचं वाईट वाटणं त्याच्या लेखी संपलं होतं. आपण घालून गेलेली चप्पल पुन्हा आणून सोडल्याचं समाधान त्याला जास्त समाधानी करत होतं. त्याच समाधानात तो बराच वेळ तसाच बसून राहिला. 

बराच वेळ गेला. आता तो पायऱ्यांवरून उठला. पुन्हा एकदा समाधानाने मूर्तीला नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला. जाताना सहज त्याचं लक्ष चप्पल स्टॅंडकडे गेलं. पाहतो तर काय... त्याची काल कोणीतरी घालून गेलेली चप्पल आहे त्याच जागी आणून ठेवलेली त्याला दिसली. तो घाईने जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं तर ती त्याचीच होती म्हणजे ज्यानं नेली होती त्यानं ती पुन्हा आणून ठेवली होती तर.... त्यानं अगदी अधाशीपणे ती चप्पल पायात सरकवली. पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!

Thursday, December 27, 2012

चप्पल

online degree programs
मूर्तीला नमस्कार करून तो मंदिरातून बाहेर पडला. देवाचं नामस्मरण करत तो बाहेर पायऱ्यांवरच एका बाजूला काही वेळ तसाच बसून राहिला. काही वेळाने उठला. पुन्हा एकदा मूर्तीकडे पाहून त्याने नमस्कार केला आणि चप्पल घालण्यासाठी तो स्टॅंडजवळ आला तर ठेवल्या जागी त्याला त्याची चप्पलच दिसेना... तो अस्वस्थ झाला. अस्वस्थपणेच त्यानं सगळं चप्पल स्टॅंड तीन-तीनदा पाहिलं; मात्र चप्पल काही त्याला सापडली नाही. मघाशी देवाचं नामस्मरण करणारा तो अस्वस्थपणे आता मनातल्या मनात चप्पल नेणाऱ्याला "लाखोली' वाहू लागला. महिनाच झाला होता चप्पल घेऊन... आता पुन्हा भुर्दंड... एकदा चप्पल घेताना शंभरदा विचार करतो आम्ही आणि नेणारा... त्यानं पुढची वाक्‍ये मनातल्या मनात उच्चारली आणि दोन शिव्याही हासडल्या... वैतागून तो पुन्हा पायरीवर जाऊन बसला...काही वेळ गेला. मनाशी काही तरी ठरवून उठला. इकडं तिकडं बघत... त्यानं त्यातल्या त्यात बरी चप्पल पायात सरकवली आणि देवाकडं पाठ करून तो मंदिरातून बाहेर पडला. 

पायऱ्या चढून घरात येता-येता, चप्पल काढतच त्याने झाली हकीकत "कुटुंबा'ला सांगितली. 
त्याच्या पायाकडं पाहत त्याचं कुटुंब म्हणालं, "हे बरं झालं बाई, काहीतरी पायात घालून आलात ते! नाहीतर नेहमीप्रमाणे मंदिरात चप्पल गेली की पायात काहीही न घालता आला असता म्हणजे उद्या पहिली चप्पल खरेदी करावी लागली असती.'' 

तिचं ते बोलणं बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं नसावं. तो कपडे काढून बेडवर आडवा झाला आणि चप्पल गेल्याचा विचार करू लागला. नेणाऱ्याला माझीच चप्पल दिसली काय? जरा नवी दिसली की घातली पायात. माणसांनी पुरती लाजच सोडली आहे. चपला पण सोडत नाहीत... अरे एखाद्याची ऐपत नसेल तर त्यानं काय अनवाणी फिरायचं? काय सालं जिंदगी...' तो चप्पलच्या विचारांतून बाहेरच यायला तयार नव्हता. एवढ्यात कुटुंब म्हणालं, "अहो तुम्ही ज्याची चप्पल घालून आलात तो बसला असेल की शोधत.'' 

झालं. तिच्या या वाक्‍यासरशी त्याच्या विचारांनी एकदम यु टर्न घेतला. अरेच्चा हा विचार मी केलाच नाही. मघाशी आवेगात चप्पल घालून आलो खरा पण, यापूर्वी मी जे अनुभवलं तोच अनुभव माझ्यामुळे एखाद्यावर येणार...आता तो आणखी अस्वस्थ झाला. त्याला आता अपराध्यासारखं वाटू लागलं. "माझी चप्पल गेली जाऊ दे... पण आपण दुसऱ्याची चप्पल घालून यायलां नको होतं. मी उद्या दुसरी चप्पल घेऊ शकतो; पण ज्याची चप्पल मी घालून आलो त्याची जर ऐपत नसेल तर... हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. भावनेच्या भरात घातली चप्पल आणि आलो घरी. का मी भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. काय अवदसा आठवली मला... विचारांचा भुंगा त्याला पोखरू लागला आणि त्याच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडू लागली... 

त्याच अस्वस्थतेत त्यानं दिवसभर ऑफिसात काम केलं. पायातली चप्पल त्याला मनात टोचत राहिली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं. काम संपवून तो घरी आला... फ्रेश झाला. त्यानं पुन्हा "ती' चप्पल अडकवली आणि तडक मंदिर गाठलं. जेथून त्यानं "ती' चप्पल पायात सरकवली होती तिथंच ती काढून ठेवली. चप्पल पायातून काढताच त्याला एकदम हलकं-हलकं वाटू लागलं. डोक्‍यावरचं ओझं उतरल्याचं समाधान त्याला मिळालं. तो पुन्हा मंदिरात गेला. मूर्तीपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याच्या मनावरील मळभही बऱ्यापैकी दूर झालं. चप्पल कोणाची का असेना, आपण पुन्हा जागेवर आणून ठेवली. ज्याची आहे तो कदाचित चप्पल शोधण्यासाठी येईल आणि त्याला ती मिळूनही जाईल; पण आता किमान ती माझ्याकडे तरी नाही याचं समाधान. हा विचार करतच तो बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला. आता पोखरणाऱ्या भुंग्याने त्याची पाठ सोडली होती. चप्पल हरवल्याचं वाईट वाटणं त्याच्या लेखी संपलं होतं. आपण घालून गेलेली चप्पल पुन्हा आणून सोडल्याचं समाधान त्याला जास्त समाधानी करत होतं. त्याच समाधानात तो बराच वेळ तसाच बसून राहिला. 

बराच वेळ गेला. आता तो पायऱ्यांवरून उठला. पुन्हा एकदा समाधानाने मूर्तीला नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला. जाताना सहज त्याचं लक्ष चप्पल स्टॅंडकडे गेलं. पाहतो तर काय... त्याची काल कोणीतरी घालून गेलेली चप्पल आहे त्याच जागी आणून ठेवलेली त्याला दिसली. तो घाईने जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं तर ती त्याचीच होती म्हणजे ज्यानं नेली होती त्यानं ती पुन्हा आणून ठेवली होती तर.... त्यानं अगदी अधाशीपणे ती चप्पल पायात सरकवली. पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!

चप्पल

मूर्तीला नमस्कार करून तो मंदिरातून बाहेर पडला. देवाचं नामस्मरण करत तो बाहेर पायऱ्यांवरच एका बाजूला काही वेळ तसाच बसून राहिला. काही वेळाने उठला. पुन्हा एकदा मूर्तीकडे पाहून त्याने नमस्कार केला आणि चप्पल घालण्यासाठी तो स्टॅंडजवळ आला तर ठेवल्या जागी त्याला त्याची चप्पलच दिसेना... तो अस्वस्थ झाला. अस्वस्थपणेच त्यानं सगळं चप्पल स्टॅंड तीन-तीनदा पाहिलं; मात्र चप्पल काही त्याला सापडली नाही. मघाशी देवाचं नामस्मरण करणारा तो अस्वस्थपणे आता मनातल्या मनात चप्पल नेणाऱ्याला "लाखोली' वाहू लागला. महिनाच झाला होता चप्पल घेऊन... आता पुन्हा भुर्दंड... एकदा चप्पल घेताना शंभरदा विचार करतो आम्ही आणि नेणारा... त्यानं पुढची वाक्‍ये मनातल्या मनात उच्चारली आणि दोन शिव्याही हासडल्या... वैतागून तो पुन्हा पायरीवर जाऊन बसला...काही वेळ गेला. मनाशी काही तरी ठरवून उठला. इकडं तिकडं बघत... त्यानं त्यातल्या त्यात बरी चप्पल पायात सरकवली आणि देवाकडं पाठ करून तो मंदिरातून बाहेर पडला. 

पायऱ्या चढून घरात येता-येता, चप्पल काढतच त्याने झाली हकीकत "कुटुंबा'ला सांगितली. 
त्याच्या पायाकडं पाहत त्याचं कुटुंब म्हणालं, "हे बरं झालं बाई, काहीतरी पायात घालून आलात ते! नाहीतर नेहमीप्रमाणे मंदिरात चप्पल गेली की पायात काहीही न घालता आला असता म्हणजे उद्या पहिली चप्पल खरेदी करावी लागली असती.'' 

तिचं ते बोलणं बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं नसावं. तो कपडे काढून बेडवर आडवा झाला आणि चप्पल गेल्याचा विचार करू लागला. नेणाऱ्याला माझीच चप्पल दिसली काय? जरा नवी दिसली की घातली पायात. माणसांनी पुरती लाजच सोडली आहे. चपला पण सोडत नाहीत... अरे एखाद्याची ऐपत नसेल तर त्यानं काय अनवाणी फिरायचं? काय सालं जिंदगी...' तो चप्पलच्या विचारांतून बाहेरच यायला तयार नव्हता. एवढ्यात कुटुंब म्हणालं, "अहो तुम्ही ज्याची चप्पल घालून आलात तो बसला असेल की शोधत.'' 

झालं. तिच्या या वाक्‍यासरशी त्याच्या विचारांनी एकदम यु टर्न घेतला. अरेच्चा हा विचार मी केलाच नाही. मघाशी आवेगात चप्पल घालून आलो खरा पण, यापूर्वी मी जे अनुभवलं तोच अनुभव माझ्यामुळे एखाद्यावर येणार...आता तो आणखी अस्वस्थ झाला. त्याला आता अपराध्यासारखं वाटू लागलं. "माझी चप्पल गेली जाऊ दे... पण आपण दुसऱ्याची चप्पल घालून यायलां नको होतं. मी उद्या दुसरी चप्पल घेऊ शकतो; पण ज्याची चप्पल मी घालून आलो त्याची जर ऐपत नसेल तर... हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. भावनेच्या भरात घातली चप्पल आणि आलो घरी. का मी भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. काय अवदसा आठवली मला... विचारांचा भुंगा त्याला पोखरू लागला आणि त्याच्या अस्वस्थतेमध्ये भरच पडू लागली... 

त्याच अस्वस्थतेत त्यानं दिवसभर ऑफिसात काम केलं. पायातली चप्पल त्याला मनात टोचत राहिली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं. काम संपवून तो घरी आला... फ्रेश झाला. त्यानं पुन्हा "ती' चप्पल अडकवली आणि तडक मंदिर गाठलं. जेथून त्यानं "ती' चप्पल पायात सरकवली होती तिथंच ती काढून ठेवली. चप्पल पायातून काढताच त्याला एकदम हलकं-हलकं वाटू लागलं. डोक्‍यावरचं ओझं उतरल्याचं समाधान त्याला मिळालं. तो पुन्हा मंदिरात गेला. मूर्तीपुढे नतमस्तक झाला. यावेळी त्याच्या मनावरील मळभही बऱ्यापैकी दूर झालं. चप्पल कोणाची का असेना, आपण पुन्हा जागेवर आणून ठेवली. ज्याची आहे तो कदाचित चप्पल शोधण्यासाठी येईल आणि त्याला ती मिळूनही जाईल; पण आता किमान ती माझ्याकडे तरी नाही याचं समाधान. हा विचार करतच तो बाहेर पडला आणि पायऱ्यांवर येऊन बसला. आता पोखरणाऱ्या भुंग्याने त्याची पाठ सोडली होती. चप्पल हरवल्याचं वाईट वाटणं त्याच्या लेखी संपलं होतं. आपण घालून गेलेली चप्पल पुन्हा आणून सोडल्याचं समाधान त्याला जास्त समाधानी करत होतं. त्याच समाधानात तो बराच वेळ तसाच बसून राहिला. 

बराच वेळ गेला. आता तो पायऱ्यांवरून उठला. पुन्हा एकदा समाधानाने मूर्तीला नमस्कार केला आणि मंदिरातून बाहेर पडला. जाताना सहज त्याचं लक्ष चप्पल स्टॅंडकडे गेलं. पाहतो तर काय... त्याची काल कोणीतरी घालून गेलेली चप्पल आहे त्याच जागी आणून ठेवलेली त्याला दिसली. तो घाईने जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं तर ती त्याचीच होती म्हणजे ज्यानं नेली होती त्यानं ती पुन्हा आणून ठेवली होती तर.... त्यानं अगदी अधाशीपणे ती चप्पल पायात सरकवली. पुन्हा एकदा मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं आणि मस्त शीळ वाजवत तो तिथून बाहेर पडला... पूर्ण समाधानाने!

Tuesday, November 13, 2012

"सृजन' ई दीपावली अंक प्रकाशित


दीपावलीच्या पहिल्या दिवशी "सृजन' ई दीपावली अंक' हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. यंदाचे "सृजन'चे दुसरे वर्ष. "सकाळ' वृत्तपत्रसमुहाचे मुख्य संपादक श्री. श्रीराम पवार यांनी क्‍लिक करून अंकाचे प्रकाशन केले आणि अंक आंतरजालावर रसिकांसाठी वाचनासाठी खुला झाला. पहिल्यांदा ई दिवाळी अंक करण्याच्या गतवर्षीच्या प्रयत्नांना भरभरून दाद दिली होतीत, यंदाही तसाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
अंकाबद्दल जरूर कळवा.

Thursday, October 25, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस


"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

Tuesday, October 23, 2012

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस

"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेत बक्षिस 
"एबीपी माझा'च्या "ब्लॉग माझा' स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा निकाल सोमवारी जाहीर झाला आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे माझ्या http://prajkta-prajkta.blogspot.in/ या ब्लॉगला उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले. हा आनंद तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मला मिळाला असे मी मानतो. म्हणूनच हा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतो.
-----

Saturday, October 13, 2012

चैतन्याचं झाड...

डोक्‍यावरून हात फिरवत केस व्यवस्थित असल्याचा अंदाज घेत त्यानं पायात चप्पल सरकवली, खांद्याला अडकवलेली पिशवी पुन्हा एकदा सरळ केली आणि तो घरातून बुथकडे जाण्यास निघाला. त्याच्या नव्या दिवसाची सुरवात झाली. घरापासून साधारण किलोमीटरवर त्याचा बुथ होता. दिवसभर काम करायचं सायंकाळी घर गाठायचं हे त्याचं गेल्या कित्येक वर्षांचं रुटीन. या रुटीनला तो मुळीच कंटाळलेला नव्हता. त्याला कारण त्याचा रोजचा जाता-येता होणारा प्रवास. या किलोमीटरच्या प्रवासात तो रोजच्या आयुष्याला नव्याने सामोरा जात असे. आजचा दिवसही असाच. तो घरातून बाहेर पडला आणि त्याची पावलं नेहमीच्या दिशेने पडू लागली.
काही अंतर जाऊन तो कोपऱ्यावर वळला आणि डाव्या बाजूला पाहत त्यानं श्रद्धेने हात जोडले. काही क्षण रेंगाळला. मंदिरातील घंटा किणकिणली... एकापाठोपाठ तिची कंपनं त्यानं रोजच्या सवयीनं ऐकली. तो तोंडातच काहीतरी पुटपुटला... बहुधा "देवा मला सुखी ठेव' असं काहीसं म्हणाला. पुन्हा वळून चालू लागला. गेल्या कित्येक वर्षांची सवय. तो खास होऊन मंदिरात जात नसे; पण रोजचा नमस्कारही चुकवत नसे. मंदिरातल्या देवानंही ते ताडलं असावं. तो त्याच्या बाहेरून केलेल्या नमस्कारावरही खुश होत असावा. कारण गेल्या कित्येक वर्षात या मंदिरात न येणाऱ्या भक्ताला त्यानं फारसा त्रास दिलेला नव्हता. त्यामुळे त्याचा रोजचा नमस्कार देवापर्यंत पोचत होता आणि देव त्यावरच खुश होता.
काही अंतर पार केलं आणि मोगरा, गुलाब, चमेली, निशिगंध, सोनचाफ्याच्या फुलांचा मिश्रित गंध त्याच्या नाकाजवळ रेंगाळला. येथूनच घराघरांतील देव्हाऱ्यांत फुलं पोचतात आणि घरं सुगंधीत होतात. काही क्षण त्याचा चालण्याचा वेग मंदावला. त्यानं फुलांच्या दिशेने पाहत हा मिश्रीत गंध छाती भरून घेतला. हा गंध आता त्याला दिवसभर सोबत करणार होता. या गंधाच्या साथीने तो दिवसभराची कामे न कंटाळता करत राहणार होता. समाधानाने तो स्वतःशीच हसला आणि चालू लागला.
आता कपबशा विसळल्याचा, चहामध्ये घालायची सुंठ छोट्या खलबत्त्यात कुटल्याचा आवाज कानावर पडला आणि तळणीचा खमंग वासही त्याच्या नाकात शिरला. त्याची पावलं "तुकाराम'च्या चहाच्या गाड्याकडे वळली. समोर मांडलेल्या खुर्चीवर तो विसावला. "काय कसं काय?'ची चौकशी झाली. तुकारामनं चहाच्या पातेल्यात ओगराळं फिरवत "मस्त चाललंय' म्हणत त्याला प्रतिसाद दिला. जोडीला इतर विषयांवर चर्चा रंगली. बोलत बोलत चहा पिऊन झाला. त्याच्या पायाला विश्रांती आणि मनाला समाधान लाभलं. अमृततुल्यची चव ओठांवर रेंगाळली तिच सोबतीला घेऊन तो बाहेर पडला आणि पुन्हा बुथ जवळ करू लागला. आता एक चौक ओलांडला की पुढच्या चौकात बुथ. चालत चालत तो दिवसाच्या कामाची मनात आखणी करू लागला. अमूक पुस्तकांचे गठ्ठे बांधून ठेवायचे. उद्या उदबत्त्या आणायला हव्यात. काही ब्रॅंड संपलेत, कागदही संपत आलेत, ते ही आणून ठेवले पाहिजेत. पुढच्या महिन्यात कॅलेंडर लागणार तेही आणले पाहिजेत... विचारांच्या तंद्रीत तो चौकाजवळ पोचला.
---
तो चौकात पोचला खरां... पण त्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू लागलं. घरातून निघालेली वेळ, तुकारामच्या चहाच्या गाड्यावर घालवलेला वेळ आणि चौकात पोचायची वेळ यांचं गणित चुकल्यासारखं वाटू लागलं. का आपला रस्ता चुकला हेही त्याला समजेना. त्यानं हातातली काठी सवयीच्या पारावर आपटली तर तो पार तेथेच होता. तेथे नेहमी दोन वाहने उभी असतात ती पण त्याच्या जागी होती. तरीही त्याला काही तरी हरवल्यासारखं वाटत होतं. आपण चुकून विचारांच्या तंद्रीत भलत्याच रस्त्याला तर लागलो नाही ना! आता तो प्रचंड अस्वस्थ झाला. आता दुकानात पोचताना कसरत करावी लागणार, चार ठिकाणी विचारावं लागणार... विचारावं लागणार या विचारानं त्याची अस्वस्थता आणखी वाढली. परावलंबित्वाचा एक काटा त्याला टोचू लागला. इलाज नाही हे समजून अंदाज घेण्यासाठी त्यानं जाणाऱ्या एकाला हटकलं आणि विचारलं. दादा इथं कोपऱ्यात एक झाड....?
तो म्हणाला,"काय राव, रस्ता रुंदीकरणासाठी कार्पोरेशननं काल रात्रीच झाड तोडलं की... लाकडं पण गोळा करून नेली!'
--
...आता मात्र तो आतून कोसळला. आधार घेत बाजूच्या पाराला टेकला. पोचेल तिथपर्यंत हात फिरवत राहिलां. बुंधा हाताला लागेल या वेड्या आशेने चाचपत राहिला. झाडच नसल्यामुळं बुंधा असण्याचा प्रश्‍नच नव्हता. रोजची त्याला परिचित असणारी पक्ष्यांची किलबिलही नव्हती... तिथून जाताना रोज अनुभवण्यास मिळणारी वाऱ्याची झुळुक नव्हती...
रोज किलबिलाटाचा आवाज कानी पडला की रस्ता बरोबर असल्याची खुण त्याला पटायची आणि पक्ष्यांच्या आवाजानं त्याच्या मनावरील निराशाही दूर होत राही. तो किलबिलाट त्याच्या अंधारल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करत राही, जगण्याचं सूत्र समजावत राही. वाऱ्याची झुळुक मनाला आणि देहाला गारवा देत राही... पण आता हे झाड भेटणार नाही... पक्ष्यांचे हक्काचे घर हिरावले गेल्याने त्यांचा किलबिलाट नाही... वाऱ्याची झुळुक नाही... जाणाऱ्या-येणाऱ्यांना सावली नाही आणि आपल्या रस्त्यात रोज मिळणारं चैतन्यही नाही... त्यानं ओलावलेले डोळे पालथ्या हाताने कोरडे केले... पुन्हा एकदा दोन्ही हात पारावर फिरविले... हाताशी झाडाचं एक गळालेलं पान लागलं. ते हाताशी घेतलं... थरथरणाऱ्या काठीने अंदाज घेतला आणि तो भरल्या मनाने दुकानाच्या दिशेने चालू लागला... 

Sunday, September 30, 2012

सामान्य जनतेचं काय?

गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन प्रमुख घटनांनी भवताल ढवळून निघाला.
एक म्हणजे सबसिडीवरील घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलिंडरची संख्या कमी करून फक्त सहाच सिलिंडर देण्याचा निर्णय झाला आणि सोबत डिझेलही प्रतिलिटर 5 रुपयांनी महाग करण्यात आले.
दुसरी म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपावरून दिलेला राजीनामा आणि त्यानंतर राज्यभर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता.
---
या दोन्ही घटनांनंतर त्याच्या प्रतिक्रिया उमटणे अत्यंत स्वाभाविक होते. पहिल्या घटनेमध्ये थेट जनतेशी, मतदारांशी संबंधित विषय असल्यामुळे विरोधक रस्त्यावर उतरणार हे शंभर टक्के खरे होते. त्याप्रमाणे ते उतरलेही; मात्र त्यामध्येही आपलाच पक्ष कसा सामान्य माणसांचा कैवार घेण्यासाठी झटतो हे दाखविण्याचीच भूमिका जास्त होती. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरून या वाढींविषयी फेरविचार करावयास लावण्याचा दबाव निर्माण करण्यात विरोधक सपशेल अपयशी ठरले. आपल्यामुळेच जनतेचा फायदा कसा झाला हे दाखविण्यासाठी स्वतंत्र ताकद दाखविण्याचा प्रयत्नच केल्याचे दिसून येते. त्यामुळे यातून ठोस असे काहीच बाहेर पडले नाही. दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यांवरून चमकण्याची संधी मात्र या निमित्ताने अनेकांनी पुन्हा एकदा साधून घेतली. बरं, महागाई वाढली काय आणि कमी झाली काय, याचा त्यांना काहीच फरक पडत नाही हे आता लपून राहिलेले नाही.
मुळात महागाईने पिचलेल्या जनतेवर सरकारने हे आणखी ओझे लादल्याने जनता पार पिचून गेली आहे. बरं, वाढ कशी अपरिहार्य आहे हे सांगत सत्ताधारी आपली बाजू ठाम करत आहेत. (मध्येच महागाई भत्ता वाढवून एक तुकडा जनतेच्या तोंडावर फेकण्यात आला आहे.) आणि विरोधक प्रसारमाध्यमांतून त्यांच्यावर तोंडसुख घेत होते. वाढ होऊन पंधरा दिवस होत आले तरी विरोधकांच्या विरोधाला काडीइतकेही यश आलेले नाही. बिचारी सामान्य जनता वाढत्या महागाईचे फटके सहन करत दिवस ढकलत आहे, हे कटू सत्य आहे.
-----
दुसऱ्या घटनेमध्ये अजित पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होण्याचे चित्र रंगवले गेले. दादांच्या मागे आम्ही कसे आहोत हे दाखविण्यातच "बळ' एकवटले गेले. हेच बळ सामान्य जनतेसाठी मात्र रस्त्यावर मुळी उतरलेच नाही. जनतेचे आम्ही "सेवक' आहोत, असा गळा काढून मतं मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या यातना दिसत नाहीत, की त्यांनी गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे? दादांप्रति निष्ठा दाखविणे हे पक्षात राहणे, व्यक्तिगत विकास साधणे यासाठी कदाचित बरोबर असेलही; मात्र याच वेळी ज्यांच्या जीवावर आपण निवडून येतो त्या जनतेच्या प्रश्‍नांसाठी आपणही रस्त्यावर उतरायला हवे याचा बरोबर विसर पडल्याचे दिसते. सिंचन घोटाळ्यातून जे निष्पन्न होईल ते होईल...; जो पैसा ज्याने कोणी खाल्ला, तो सामान्य जनतेकडून वसूल केलेल्या करांमधील आहे हे कोण, कधी विचारात घेणार की नाही? दादा सत्तेवरून पायउतार झाले, त्यांची खाती घेऊन अन्य कोणी तरी त्या खुर्च्यांमध्ये बसेल. आठवडाभर झालेल्या गोंधळाचा धुरळा खाली बसेल. मनोमीलनाच्या नावाखाली पुन्हा गळ्यात गळे घातले जातील आणि हताश जनता पाहण्याशिवाय काही करू शकणार नाही. तिच्या नशिबी महाग सिलिंडर, महाग डिझेल आणि महागाईचे आक्राळविक्राळ रूपच असेल. 

Monday, September 24, 2012

मांगल्यभरला भवताल!

विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाले. सगळीकडे वातावरण भक्तिमय बनलं आहे. खूप छान वाटतंय. सकाळी-संध्याकाळी आरतीचे सूर कानावर पडत आहेत. रेंगाळत राहिलेला फुले, धूप-अगरबत्तीचा सुगंध उत्सवाचा गंध मनापर्यंत पोचवत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे निनादत आहेत. कमी आवाजात का होईना डॉल्बीही वाजताना दिसत आहे. सगळं कसं प्रसन्न-प्रसन्न! मनामनांत ही प्रसन्नता तुडुंब भरलेली असल्यामुळेच सारा भोवतालही त्याच लाटेवर स्वार झाला आहे. 
निरनिराळ्या आकारांतील गणेश मूर्ती कलाकारांची कला जगासमोर ठेवत आहे. मूर्तींचे सौष्ठव पाहताना तल्लीन व्हायला होत आहे. भावगर्भ नेत्र, मस्तकावरील किरीट, आभूषणांनी युक्त असं मनमोही रूप आठवून आठवून मनात साठविलं जात आहे आणि मनोमन नमस्कारही पोचता केला जात आहे. 
पाऊस कमी पडलाय. महागाई वाढणार या नकारात्मक बाबीवर काही प्रमाणात का होईना हा उत्सव फुंकर घालत आहे. जगण्याची उमेद मनामनांत जागवत आहे. ऊर्जा निर्माण करून जगण्याची प्रेरणा पेरत आहे. मंगलमयी वाटेवरून चालताना अंतर्मुखही करायला भाग पाडत आहे. भोवताली घडणाऱ्या विविध घटनांचा मेळ घालण्यास भाग पाडत आहे. "मी- माझं' या चक्रातून बाहेर पडण्याविषयी सुचवून "आपण-आपलं'च्या दिशेने जाण्यासाठी थोडीफार तरी दिशा देत आहे. उत्सवाच्या निमित्ताने का होईना हातात हात गुंफून काही तरी विधायक घडविण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याचे दिसते. भक्तीच्या वाटेवरचे प्रवासी होताना थोड्या प्रमाणात का होईना समाजाला माघारी काही तरी देण्याचं मन होत आहे. गणेशाप्रति काही तरी करताना ते ओझे न वाटता एक जबाबदारी पेलल्याचे समाधानही काही जण मिळवत आहेत. हे लाखमोलाचं समाधान त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे

Saturday, September 22, 2012

मांगल्यभरला भवताल!


विघ्नहर्त्याचे आगमन होऊन चार दिवस झाले. सगळीकडे वातावरण भक्तिमय बनलं आहे. खूप छान वाटतंय. सकाळी-संध्याकाळी आरतीचे सूर कानावर पडत आहेत. रेंगाळत राहिलेला फुले, धूप-अगरबत्तीचा सुगंध उत्सवाचा गंध मनापर्यंत पोचवत आहे. काही ठिकाणी ढोल-ताशे निनादत आहेत. कमी आवाजात का होईना डॉल्बीही वाजताना दिसत आहे. सगळं कसं प्रसन्न-प्रसन्न! मनामनांत ही प्रसन्नता तुडुंब भरलेली असल्यामुळेच सारा भोवतालही त्याच लाटेवर स्वार झाला आहे.
निरनिराळ्या आकारांतील गणेश मूर्ती कलाकारांची कला जगासमोर ठेवत आहे. मूर्तींचे सौष्ठव पाहताना तल्लीन व्हायला होत आहे. भावगर्भ नेत्र, मस्तकावरील किरीट, आभूषणांनी युक्त असं मनमोही रूप आठवून आठवून मनात साठविलं जात आहे आणि मनोमन नमस्कारही पोचता केला जात आहे.
पाऊस कमी पडलाय. महागाई वाढणार या नकारात्मक बाबीवर काही प्रमाणात का होईना हा उत्सव फुंकर घालत आहे. जगण्याची उमेद मनामनांत जागवत आहे. ऊर्जा निर्माण करून जगण्याची प्रेरणा पेरत आहे. मंगलमयी वाटेवरून चालताना अंतर्मुखही करायला भाग पाडत आहे. भोवताली घडणाऱ्या विविध घटनांचा मेळ घालण्यास भाग पाडत आहे. "मी- माझं' या चक्रातून बाहेर पडण्याविषयी सुचवून "आपण-आपलं'च्या दिशेने जाण्यासाठी थोडीफार तरी दिशा देत आहे. उत्सवाच्या निमित्ताने का होईना हातात हात गुंफून काही तरी विधायक घडविण्याच्या दिशेने पावले पडू लागल्याचे दिसते. भक्तीच्या वाटेवरचे प्रवासी होताना थोड्या प्रमाणात का होईना समाजाला माघारी काही तरी देण्याचं मन होत आहे. गणेशाप्रति काही तरी करताना ते ओझे न वाटता एक जबाबदारी पेलल्याचे समाधानही काही जण मिळवत आहेत. हे लाखमोलाचं समाधान त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Saturday, June 23, 2012

पाऊस दोघांतला

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला...

Tuesday, June 12, 2012

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

पाऊस दोघांतला..

तो गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला... आभाळ गच्च भरून आलेलं... दूरवर कुठे तरी पाऊस पडत असावा... गार वारा त्याची साक्ष देत होता... आणि इथे तो कोणत्याही क्षणी अस्तित्व दाखवेल असं वातावरण तयार झालेलं... आतून अस्थिर असल्याने वाहणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श त्याच्या मनापर्यंत पोचत नव्हता. दूरवरचे  ढगाळलेले क्षितिज न्याहाळताना त्याच्या मनावरही त्याची काही पुटे चढत राहिली. तो आतून भरून आलेला... आता कोसळायचा फक्त बाकी होता...
उद्या कोर्टात आपल्या सहा वर्षांच्या संसाराचा "निकाल' लागणार. गैरसमजाच्या झाडाला किती कडू फळं येतात हे इतके दिवस ऐकलं होतं, आता ती अनुभवावी लागणार. कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तिला पटत नाही आणि तिला ते पटावं असं तिच्याभोवतीच्या काहींना वाटत नाही. होत नाहीत का माणसाच्या हातून चुका? बरं, नसलेल्या चुकाही मान्य करून पुन्हा एक संधी मागतोय. ती देण्याचा मोठेपणा ना ती दाखवतेय ना तिच्या घरचे... का तिला जाणीवपूर्वक माझ्यापासून दूर केलं जात आहे? आठ वर्षांच्या सहवासाने दोघांमधील विश्‍वास, ओढ किती भक्कम आहे याची वेळोवेळी साक्ष पटली आहे. नेहमी ती माझ्यासोबत राहिली. मी कोसळताना ठामपणे पाठीशी उभी राहिली. मंदीने नोकरी हिरावल्यानंतर पुन्हा नवा जॉब मिळेपर्यंतचे दोन महिने दुप्पट राबली. मला जरासुद्धा त्याची झळ लागणार नाही यासाठी धडपडली. ओव्हरटाईम करताना चिन्मयकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली. मी दिवसभर नोकरी शोधत भटकताना माझा खिसा हलका राहणार नाही हे पाहिलं. बरं, हे सर्व करूनही आपण काही वेगळं करतोय असा अभिनिवेशही दाखविला नाही. सगळं किती व्यवस्थित मॅनेज केलं; पण सहा-सात महिन्यांपूर्वी काय बिघडलं कोण जाणे... सगळे रंगच उडून गेले. मला जॉब मिळून सगळं सुरळीत सुरू झालं, असं वाटत असताना अचानक काहीतरी बिनसलं. आधी अबोला, मग वाद, नंतर भांडणं आणि थेट "वेगळं' होण्याची मागणी. बरं, कारण काय तेही सांगत नाही. कारण समजलं तर निदान त्यावर चर्चा तरी करता येईल. जॉब नसल्याच्या टेन्शनमध्ये मी कधी नव्हे ती "घेतली'... पण एकदाच. मला माझी चूक समजली. त्याबद्दल माफीही मागितली तिची. चिडचिड झाली तेव्हा एकदा तोलही गेला आणि बोललोही तिला वाट्टेल तसं; पण तरीही ही काही एवढी मोठी कारणं नव्हती, की लगेच वेगळं व्हावं... मग नेमकं झालंय तरी काय? कसं कळणार? एक मात्र खरं, गैरसमजातून... कायद्याच्या तडाख्याने काडी काडी करून उभं केलेलं घरटं मोडलं जाणार हे नक्की... जरा आपणच माघार घेतली असती तर...
ें----
पाऊस येणार का?... येईल बहुधा... भरून तर आलं आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळू लागेल; पण तोपर्यंत घालमेल होत राहणार... वारा सुटलाय खरा; पण त्यामध्ये फारसा दम नाही. एकदाचा कोसळून जाऊ दे... म्हणजे सगळं मोकळं मोकळं होईल... सभोवार आणि मनावरही दाटलेलं मळभ एकदाचं दूर होईल... रितं झाल्याशिवाय नव्या विचारांना धुमारे कसे फुटणार? उद्या आपल्या मनावर साठलेलं मळभही दूर होईल कदाचित... काय माहीत काय होतं ते...? विचारांनी तिच्या डोक्‍यात नुसता चिखल झाला होता...
उद्या कोर्टात काय होणार? चिन्मयची कस्टडी मिळणार का आपल्याला? तोच तर एक आधार आणि त्याची आपल्याकडे राहणारी एकमेव आठवण. जर कस्टडी नाही मिळाली तर... तर... आपल्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. माझं असं कोण उरणारच नाही. काही प्रश्‍न आपले आपणच सोडवायचे असतात हेच खरं... पण, आपल्याला हे समजलंच नाही. तो माफी मागत होता... त्यावेळीच आपण त्याला माफ करून या विषयावर पडदा टाकायला हवा होता (बहुधा त्याची चूक नव्हती. आपणच आक्रस्ताळेपण केला... कोणाच्या तरी.. काहीबाही सांगण्यावरून... शहानिशा न करता) पण त्यानं तरी असं का वागावं? वाटेल तसं बोलला.. "घेऊन' आला... हे म्हणजे अतिच झालं. खरं तर त्याची चूक नेमकी काय झाली आणि आपण त्यावर का रिऍक्‍ट झालो तेही आता लक्षात नाही. गैरसमज झालाय खरा. तो दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जवळच्यांनी तो दूर करूच दिला नाही. उलट दोघांत दुरावा वाढेल असंच पाहिलं. तोही मोकळेपणाने बोलला नाही... घातला मी वाद तर प्रतवादच करत राहिला. गैरसमजाचं विष उतरण्याऐवजी पसरत राहिलं. काय अवदसा आठवली आणि कोणताही विचार न करता वेगळं होण्याच्या अर्जावर सह्या केल्या. चुका कोणाच्या हातून होत नाहीत; पण त्यानं जरा पडती बाजू घेतली असती तर... मीच का पडती बाजू घ्यायची? ...स्त्री आहे म्हणून...? पण उद्या आपलं घर मोडणार हे नक्की. सहा वर्षे प्रत्येक क्षण जपत दोघांनी उभं केलेलं... दोघांनी कष्ट सोसून भक्कम केलेलं... मग ते डगमगलं कसं?... गैरसमजाच्या वादळाने विश्‍वासाला धक्का लागलाच कसा?....आपलंच काही चुकलं नाही ना?
ें----
""बाबा, तू कुठे निघालास... मला सोडून.. आईला सोडून? माझ्याशी कट्टी केलीस का तू? ए, जाऊ नको ना तू आम्हाला सोडून...''
चिन्मयच्या बोबड्या बोलांनी तो थबकला... "मी'पणा गळून पडला... आतून कोसळला... वळला आणि चिन्मयला येऊन बिलगला... ढसाढसा मोकळा होऊ लागला...
""मला नाही रे जायचं तुम्हा दोघांना सोडून...'' एवढंच म्हणाला...
त्याच्या या वाक्‍याने ती थिजली... त्या दोघांशिवाय आपण अपूर्ण आहोत... या जाणिवेनं कोलमडली... कमीपणा घेण्यातलं सुख तिला जाणवलं... ती पुढे झाली, चिन्मयच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, ""...चला "आपल्या' घरी जाऊ आपण!''
त्याच वेळी दाटून आलेलं गच्च आभाळ सुटलं... जलधारांतून बरसू लागलं... अश्रूंमधून वाहू लागलं... गैरसमजाने मोडू पाहणारं घर... समजुतीनं सावरलं. दोघांच्याही मनावरचं मळभ दूर झालं... आनंदभरला पाऊस... डोळ्यांतून अखंड झरझरत राहिला... 

Wednesday, June 6, 2012

पहिला पाऊस




दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही... 

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला... 

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत.....

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

Tuesday, June 5, 2012

पहिला पाऊस


दुपार कलंडू लागली आणि आकाशपटलावर ढगांची मैफल जमू लागली आणि पाऊस ओतायच्या आत घरी पोचावं या मनीषेनं स्नेह्यांच्या घरातून पाऊल बाहेर टाकलं. बाईकला किक मारली आणि बाहेर पडणार तेवढ्यात थेंबांचे सूर उमटू लागले. बाईक लगेच माघारी वळविली पुन्हा स्नेह्यांच्या घरी येऊन थांबलो. थेंबांच्या धारा झाल्या आणि पागोळीमधून वाहणाऱ्या धारा दिसू लागल्या. खिडक्‍यांच्या काचांवर थेंबांची दाटी झाली. अंगणातल्या फरशीवर पाऊस फुलांमध्ये उमलण्याची स्पर्धा सुरू झाली. एकेक फूल उमलत राहिले. मातकट पाण्याचे प्रवाह वाहू लागले. मातीचा सुगंधही नाकाशी रुंजी घालू लागला. त्या घराच्या खिडकीमधून हा पहिला पाऊस न्याहाळताना मित्र भेटल्याचा मनस्वी आनंद होत राहिला; पण पावसात जाऊन भिजण्याची अनिवार भावना मात्र तशीच दाबून ठेवली गेली. फार मोठी नाही पण पंधरा-वीस मिनिटे ही झड सुरू राहिली. भोवतालची झाडे हा पाऊस आसुसून प्याली आणि तजेला मिळवून आनंदाने लहरली...वारे वाहू लागले आणि ढगांनी एकमेकांशी फारकत घेतली. मैफल रंगू पाहत असताना उठली...मी अलिप्तपणे त्या मैफलीचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला; पण पूर्णत्वाचे समाधान काही लाभलेच नाही...

...मी बाहेर पडलो...बाईकला वेग दिला. वाटेत कामानिमित्त पंधरा-वीस मिनिटे थांबावे लागले. काम आटोपले आणि घर जवळ करू लागलो. पंधरा-वीस मिनिटांच्या कालावधीत मघाशी उठलेली ढगांची मैफल पुन्हा एकदा मस्त जमू लागल्यासारखे वाटले. पुन्हा एकदा थेंबांनी तारा झंकारल्या...धारांचे संगीत झंकारू लागले आणि पाहता पाहता मैफल रंगू लागली. पाठोपाठ पाऊस धारांच्या सुरावटी लडीवाळपणे सलगी करू लागल्या. आता मात्र या मैफलीला नाकारणे शक्‍यच नव्हते. बाईकच्या मुठीवरील पकड ढिली झाली, वेग कमी झाला आणि मी त्या मैफलीतला एक होऊन गेलो. आता भवताल विसरला...बाईक चालत राहिली...मी पाऊसधारांच्या सुरावटींमध्ये तल्लीन झालो...माझ्या भोवती फेर धरून नाचणाऱ्या पाऊसधारांच्या गाण्यात एकरूप झालो...थेंबांतून झंकारणाऱ्या आरोह-अवरोहांचे तरंग मनावर उमटत राहिले...गडगडणाऱ्या ढगांतून तबल्याचा नाद मैफलीला उंची देऊ लागला...

...बाईक गचके देत थांबली...तंद्री भंगली...ऐन पावसात बंद बाईकला सुरू करण्याचा प्रयत्न चालू ठेवला; पण मैफल मोडू दिली नाही. माझ्या जिद्दीपुढे बाईक नमली...गुरगुरली...सुरू झाली...घराच्या दिशेने धावू लागली. नखशिखांत भिजूनही मैफलीचा आनंद तसूभरही कमी झाला नाही. उलट वाढतच राहिला. घर जवळ आले आणि पहिल्या पावसाच्या मैफलीचा आनंद अंगभर मिरवतच घरात प्रवेश केला. पुन्हा नव्या मैफलीच्या प्रतीक्षेत..... 

Saturday, May 26, 2012

आली लग्न घटी समीप


सनईच्या सुरावटीनं विवाह मंडप भरून गेलेला...
लग्नघटिका समीप येऊन ठेपलेली...
उपस्थित आप्तेष्ट, जिवलग, नातलग, सगेसोयरे हातात फुलपाकळ्या, अक्षता घेऊन मंत्रोच्चाराच्या प्रतीक्षेत...
करवल्यांची गडबड... मामा मंडळींची धावपळ...
सजलेल्या लग्नवेदीवरील फुललेले हार तिला भेटण्यास आतूर...
तो येऊन उभा... जन्माची गाठ बांधण्यास उत्सुक... मुंडावळ्यांआडून तिची चाहूल शोधणारा...

..ती...
गौरीहारासमोर बसलेली...
लग्नघटिका जवळ येईतो "नवे' पाऊल टाकण्यास उत्सुक असलेली...
प्रत्यक्ष पाऊल टाकण्याचा क्षण खुणावू लागल्याने मागे-मागे रेंगाळणारी...
गौरीहारावर पुनःपुन्हा हळदी-कुंकू वाहत "तो' क्षण लांबवू पाहणारी....
पुरोहितांचे बोलावणे कानावर पडताच.... भरल्या मनाने... हळुवार पावलांनी विवाहवेदीकडे जाण्यास निघणारी
त्याक्षणी युगायुगाचे वाटणारे हे अंतर... मनाशी कल्लोळ पेलत कमी करणारी...

...नेमका असाच ऊर घुसमटणारा कल्लोळ तिच्या जन्मदात्यांच्याही मनी
तिला फुलापरी जपणाऱ्या तिच्या दादा आणि सखी म्हणून मिरविणाऱ्या ताईच्याही हृदयी...

ती...
माझ्या मायेच्या अंगणाची सय आज संपणार...
जेथे भातुकलीचा खेळ मांडला... दादा-ताईसोबत भांडून... मी हरलेला प्रत्येक डाव जिंकला...
जेथे माझी पावलं आई-बाबांचे बोट धरून उभी राहिली... नंतर दुडदुडली आणि मग मुक्तपणे पडली...
ते अंगण माझ्यासाठी अनोळखी होणार...
माझ्या बोटाला धरून ज्यांनी माझं पहिलं पाऊल साजरं केलं... माझ्या पावलांना बळ दिलं...
माझ्या ओठी मायेचा घास भरवत लहानाचं मोठं केलं...
संस्कारांच्या शिदोरीने माझं मन तुडुंब भरलं...
कधी समजावून सांगून, कधी समजून घेऊन, कधी माघार घेऊन पुरविला माझा हट्ट...
चुकल्यावर काहीसं रागे भरून... पण नंतर पाठीवरून मायेचा हात फिरवून मला समजावलं...
माझ्या पंखांत बळ भरलं...
जगण्याशी दोन हात करण्यासाठी खंबीर बनवलं...
प्रत्येक हळवे क्षण जपले...
स्वतंत्र ओळख रुजविण्यासाठी धडपडले...
माझ्या सुखमय भविष्यासाठी दुरावा लाभणार असूनही चेहऱ्यावर हास्य दाखवून दुःख ठेवलं पोटात... खोलवर...
माझ्या आनंदासाठी शरीर आणि मन दोन्ही झिजवलं...
कमीपणा घेण्यातही नाही मानला कमीपणा...
त्या आई-बाबांसोबत अंतर आता पडणार....
...घराच्या प्रत्येक कोपऱ्याला दुरावणार...
या भिंतींच्या साक्षीने जगलेल्या त्या सर्व क्षणांना पारखी होणार... गोड गुपितं... माझे सवंगडी... माझ्या सख्या... माझे सोबती... माझी हक्काची ठिकाणं... छोटे छोटे आनंदाचे क्षण... लुटूपुटूची भांडणं... रागावणं... रडणं... ओरडणं... खळाळून हसणं... टाळ्या पिटणं... सारं सारं इथंच राहणार...
...आपलं माहेरपण सुरू होणार...!

आई...
जन्माला आली तेव्हा वाटलं प्रतरूपच आलं पोटी...
हाताचा झोका करून वाढवताना...
बोबडे बोल ऐकताना...
बाळमुठी वळताना... प्रत्येक पाऊल सावरताना...
बाललीला अनुभवताना... छातीशी बिलगून घेता-घेता... ती कधी माझी सावली बनली समजलंच नाही...
छोटी पावलं मोठी झाली... आकाश तिचं विस्तारलं...
अंगणातली तिची भातुकली सावरताना आठवणींची रांगोळी आपसुक सजली...
डोळ्यासमोर राहिले उभे आयुष्यातले ते साठवले क्षण
तिचं शाळेच्या पहिल्या दिवशीचं रडणं... आणि शाळा सुटल्यानंतर येऊन घट्ट बिलगणं...
शाळेतलं यश साजरं करणं आणि छोट्या छोट्या हातांनी स्वयंपाकघरातलं लुडबुडणं...
वाढत्या वयाबरोबर तिचं प्रगल्भ होणं आणि माझा त्रास कमी करण्यासाठी सतत धडपडणं...
अडचणींत माझ्यासह घर सावरणं...
लाघवी बोलण्यानं माणूस-माणूस जोडणं...
अडचणीतून मार्ग काढताना खंबीर उभं राहणं...
"आई मी आहे गं!' हे आधाराचे शब्द बोलणं आणि सावली बनूनच पुढं... पुढं जाणं...
कधी रुसणं... कधी फुगणं... पण माझ्या संस्कारांना जागून माझं नाव राखण्यासाठी धडपडणं...
मैत्रीण, माझी सखीच ती...
बोलली नाही कधी उलटे, की बोलली नाही कधी लागट...
सावरलं... मलाच समजावलं... जेव्हा कधी आली अडचण...
घराचं घरपण सर्वांनी टिकवायचं असतं... जाणून घेतलं तिनं...
जन्मली तेव्हाच होतं ठाऊक...
कधी ना कधी दुरावणार हे परक्‍याचं धन...
आता आली वेळ... घटका-पळे भरतील..."...सावधान' म्हटले जाईल...
...माझी ही वेल तिच्या हक्काच्या अंगणी रुजण्या सप्तपदी चालेल....
पावले ती टाकेल सात... आणि... मी शोधत राहीन... तिची माझ्या आयुष्यातून निसटून चाललेली पाऊलवाट...!

बाबा... 
पाहू या - करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला "तो' सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटींनी भारला सारा भवताल.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा,
तुझा पहिला मृदू सहवास...
लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश...
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन लुटलेला बापपणाचा आनंद...
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण...
कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून
मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप...
कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं... आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌...
"बाबाऽऽ म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...
खरं सांगतो पोरी,
तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण... धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..! 

Sunday, May 6, 2012

दिल को लग गयी...


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने

दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्‍य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिरखान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्‍सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं. कार्यक्रमाचा प्रत्येक मिनिट पुढे-पुढे सरकत राहिला आणि आमिरखान या माणसाचं भोवतालच्या परिस्थितीबाबत असलेलं अवधान स्पष्ट होत राहिलं.
आमिरने छोट्या पडद्यावर येण्याचा मोह सातत्याने टाळला. त्याला कित्येकदा विचारणा करूनही, पैशांच्या थैल्या रिकाम्या करूनही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. जेव्हा त्याच्या मनाने त्याला साद घातली तेव्हा त्याने छोट्या पडद्यावर यायचं ठरविलं मात्र तेही काहीतरी वेगळं करून दाखविण्याचा मनाशी चंग बांधूनच. त्यासाठी गेली दोन वर्षे त्यानं चौफेर अभ्यास केला. ....असं केलं तर कसं होईल? तसं केलं तर कसं होईल?...कार्यक्रम तर करायचा पण निव्वळ करमणूक म्हणून नाही. माझा कार्यक्रम वेगळा कसा होईल याचा ध्यास त्यानं घेतला. त्यासाठी भक्कम पूर्वतयारी केली. देशाच्या कानाकोपऱ्यात तो फिरला, सगळ्या टिमला त्यानं फिरवलं...आपण जे करणार आहे... त्यातून समाजाच्या भल्यासाठी काही करता येईल का? या एकमेव विचाराने तो झपाटला असावा... असं एकूण "सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा पहिला भाग पाहिल्यानंतर सारखं वाटत राहतं.
पहिल्या भागामध्येच त्याने देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या "स्त्री भ्रूण हत्येसारखा' प्रचंड संवेदनशील विषयाला हात घातला आहे. हा विषय यापूर्वी वाहिन्यांवर, माध्यमांतून अनेकदा येऊन गेलेला आहे...तरीही आमिरने त्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या कितीतरी पट अधिक आहे हे जाणवत राहतं.
त्यानं मांडलेली तिन्ही उदाहरणे ही प्रतिकात्मक पण, तरीही अंगावर येणारी...पाहताना ऐकताना अंगावर काटा आणणारी...ज्यांनी भोगलं त्यांच्याविषयी अपार करुणा भरून आणणारी आणि ज्यांनी केली त्यांच्याविरोधात पेटून उठायला लावणारी आहेत...त्यांनी जे सोसलं ते पाहताना डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा करणारं आणि आपल्याच अवती भोवती हे सारं घडतंय हे जाणून अस्वस्थ करायला लावणारी होती.
हे सारं मांडताना आमिरचं थेट ह्रदयाला हात घालणारं निवेदन आणि प्रत्येक मुद्याशी प्रेक्षकांना जोडण्याचा त्याचा प्रयत्न पहिल्या भागात तरी नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. तो विषय मांडून थांबत नाही...त्यावरील उत्तर सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न तो करतो आहे. त्यासाठी तो पुढाकार घेणार आहे ही अत्यंत महत्वाची बाब. मी सांगतो तुम्ही करा...असा उंटावरून शेळ्या हाकण्याचा कोणताही प्रयत्न यामध्ये नाही...मी तुमच्यातलाच एक आहे आणि हा मुद्दा उपस्थित केला आहे. आपण मिळून त्यावर तोडगा काढायचा आहे हे अत्यंत संयमीत पण परिणामकारकरित्या सांगण्याचा त्याचा प्रयत्न म्हणूनच भावणारा आहे.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला नेण्यात तो यशस्वी झालाच; पण जेव्हा रविवारी सकाळी अकरा वाजता दूरचित्रवाहिनी संच सुरू करून प्रेक्षकांनी आपल्या सुटीमधील नव्वद मिनिटे घालविली तेव्हा ती वाया गेली नाहीत...याचं समाधान त्यानं दिलंच...वरपक्षी या नव्वद मिनिटांचं गारूड पुढचा एपिसोड येईपर्यंत कायम राखण्यात तो यशस्वी ठरला.
एरव्ही हाच विषय एक डॉक्‍युमेंटरी सारखा वाटला असता; पण आमिरच्या सादरीकरणाने त्याची दाहकता पाहणाऱ्याच्या काळजापर्यंत नक्कीच पोचली आणि हेच आमिरच्या मालिकेच्या पहिल्या भागाचे यश. कार्यक्रम पाहताना त्याला नक्की काय करायचं आहे? त्याला नक्की कोठे जायचं आहे हे स्पष्ट असल्याचं जाणवत राहतं. बरं हे मांडताना आपण हा प्रश्‍न सोडविणार आहे असा दिवास्वप्न दाखविणारा आव तो आणत नाही हे सर्वात महत्त्वाचे.
चला आता उत्सुकता आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय असणार याची आणि खात्री वाटते तो भागही असाच वेगळा...ह्रदयाला हात घालणारा असेल...लेटस सी... 

Thursday, March 29, 2012

"सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष आता "नेटभेट'वर'


                                       http://ebooks.netbhet.com/2012/03/marathi-online-emagazine.html
गुढीपाडव्यानिमित्त प्रकाशित केलेल्या "सृजन...'च्या अंकास वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आता हा अंक नेटभेटवरही उपलब्ध झाला असून त्याची लिंक सोबत देत आहे. अंकाबद्दल जरूर जरूर कळवा. 

Tuesday, March 27, 2012

'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'

 अंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.
नमस्कार,
दिवाळीमध्ये "सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि "सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


                                                   

'सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष...'



                                                     अंक सोबतच्या लिंकवर वाचता येईल.


                                              1) http://www.scribd.com/doc/86917638/srujan-padwa-2012



नमस्कार,
दिवाळीमध्ये "सृजन ई दिवाळी अंक' प्रकाशित केला, त्याला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर आता मराठी नववर्षाच्या प्रारंभी असाच अंक करावा असे अगदी ऐनवेळी सुचले आणि "सृजन ई गुढीपाडवा वसंत विशेष' हा अंक आकाराला आला. अगदी कमी वेळेमध्ये हा अंक सजविण्याचा प्रयत्न केला आहे. गडबड झाली आहे खरी पण आता पूर्णत्वाचा आनंदही लाभला आहे. अगदी ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवल्यामुळे गुढीपाडव्यादिवशी हा अंक अपलोड करू शकलो नाही याची सल आहेच. असो यातूनही काही नवीन शिकायला मिळाले हे मात्र नक्की. एक प्रयोग आपल्यासारख्या सुजाण साहित्यरसिकांपुढे ठेवत आहे. त्याला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. त्रुटींबद्दल जरूर लिहा. पुढील वेळी त्या सूचना आम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाची वाट पाहत हा अंक आपल्यासमोर ठेवत आहे. प्रतिक्रिया जरूर जरूर कळवा.
नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 

Saturday, February 18, 2012

"राजसाहेब' बाळाच्या पायात "बळ' भरलं

                                             
                                               छायाचित्र संकेस्थळावरून साभार 

"अवघ्या सहा वर्षांपूर्वी माझ्या पक्षाचा जन्म झाला आहे. लगेच त्याच्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका; देणार असाल तर एकहाती सत्ता द्या, माझ्यात नवनिर्माणाची धमक आहे. संधी द्या सोनं कसं करतात ते मी दाखवून देईन'

हे आत्मविश्‍वास भरले आवाहन गेल्या काही दिवसांत "मनसे' करणारे राज ठाकरे यांचा आत्मविश्‍वास शुक्रवारी जेव्हा महापालिकांचा निकाल लागला तेव्हा नक्कीच दुणावला असेल. मुंबईवर जरी महायुतीचा भगवा फडकला असला तरी त्याचवेळी मनसेच्या पदरातही मतदारांनी झुकते माप टाकलेच याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. विशेषतः दादर-गिरगावच्या पट्ट्यामध्ये मनसेने धडक मारताना शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करून "मराठी टक्का' आपल्याकडे वळविण्यात मिळविलेले यश शिवसेना नेतृत्वाला विचार करावयास लावणारे आहे.
प्रभावी वक्तृत्व, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्राला घातलेल्या सादेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे हे मनसेला मुंबई, नाशिक, पुणे या महानगरांत मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होत आहे. नाशकात हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात राष्ट्रवादीपाठोपाठ तो दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर ज्या मुंबईमध्ये त्यांना किंगमेकर होण्याची मनिषा होती तेथेही त्यांनी आपली ताकद चौपट वाढविण्यात यश मिळविलेले आहे. हे नक्कीच पक्ष विस्तारत आहे, बळ भरत आहे हे दर्शविणारे आहे.
नाशकात तर हा पक्ष निर्विवादपणे किंगमेकर ठरू शकतो. आकडेवारीचा हिशोब केला तर आघाडी किंवा युती स्वबळावर सत्तेवर येऊच शकत नाही. एकतर दोघांना हातात घालावा लागेल किंवा मनसेच्या इंजिनाला जोडून घेऊन सत्तेचा प्रवास करावा लागेल हे स्पष्ट आहे. पुण्यात आघाडीची सत्ता येणार असली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दोन्ही कॉंग्रेसला हा पक्ष जेरीस आणू शकतो.
राज्यातील या प्रमुख तीन महानगरांत उत्तम कामगिरी करणारा हा पक्ष रांगत आहे असे सांगणाऱ्यांना हे बाळ आता खऱ्या अर्थाने दमदार पावले टाकू लागले आहे हे समजून चुकले असेल.
ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचाच काही वर्षांपूर्वीपर्यंत एकहाती करिष्मा होता.( गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे पक्षासाठी वर्षांत जीवतोड मेहनत घेत आहेत हे मुळीच नाकारता येत नाही, सर्व विरोधात असूनही त्यांनी मुंबईत सत्ता राखण्यात मिळविलेले यश त्यांची मुत्सद्देगिरी दाखवून देतेच.) त्याप्रमाणेच सध्या राज यानी मनसेसाठी एकहाती यश मिळवून दिले आहे. यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे कौतुक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आहे. राज यांच्यावरही जीव ओवाळून टाकणारी एक पिढी निर्माण होऊ लागली आहे, हेही या निकालाने स्पष्ट झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पोचण्यासाठी राज यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की. सध्या त्यांच्या पक्षाचा पाया महानगरांत विस्तारतो आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्ष पोचणे हेही अत्यंत आवश्‍यक आहे. (जिल्हा परिषदांचे निकाल पक्षासाठी अंतर्मुख करणारे आहेत, अर्थात तेथे राज यांनी ताकद लावलेली नाहीच हेही तेवढेच खरे, ज्या काही जागा निवडून आल्यात त्या राज यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या शिलेदारांच्या कष्टाचा आरसा आहे. हेच शिलेदार भविष्यात मनसेचे भक्कम आधारस्तंभही होऊ शकणार आहेत. याकडे राज यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे) अर्थात या सर्वांची जाणीव राज यांना नक्कीच असेल.
यदाकदाचित राज यांच्या हाती नाशकात सत्तेच्या चाव्या आल्याच तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. नवनिर्माणाचे मॉडेल ते येथे सादर करू शकतील आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विश्‍वास देऊ शकतील. जर ते तसे नाही करू शकले तर त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही भाषणांतील स्वप्नरंजनच ठरेल. एकमात्र खरे सध्या तरी प्रमुख महानगरांतील काही टक्के नागरिकांनी राज यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या स्वप्नांवर विश्‍वास दाखविलेला आहे. भविष्यात हे बळ वाढविणे आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकणे हेच मनसे नेतृत्वापुढे आव्हान असेल. तुर्तास या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अगदी मनसे शुभेच्छाः
जय महाराष्ट्र! 

Wednesday, February 15, 2012

मैत्रीण...

मोबाईलची रिंग वाजली, झोपेतच त्यानं मोबाईल उचलला... कानावर आवाज पडला, "आज आपण भेटायचं नक्की नं?' तिच्या किणकिणत्या प्रश्‍नानं त्याची झोप उडाली. 
"भेटायचं म्हणजे काय भेटायचंच! मी अगदी वेळेत पोचतो.' 
गेले सहा महिने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आयुष्यात येणार. वर्षभर ज्या आवाजावर आपण फिदा आहोत त्या आवाजाच्या गळ्यासोबत आपली पहिली भेट होणार. कशी असेल ती? कशी दिसेल ती? आवाजाप्रमाणेच गोड असेल का? किती प्रश्‍न. 
आकाशवाणीवर जेव्हा कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करते तेव्हा ऐकत राहावे वाटते. पत्रमैत्री आणि फोनवरून संवाद सुरू झाल्यानंतर तिनं मला कधी झिडकारलं नाही. अनेक गोष्टी शेअर केल्या. मैत्रीण बनून अनेक चांगले सल्ले दिले. जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा हक्काने तिला सांगितले आणि तिनेही आपुलकीने प्रत्येक बाबीची चौकशी करून त्यावर सल्ला दिला. मध्यंतरी महिनाभर जेव्हा काही कारणाने फोनवर बोलणे होऊ नाही शकले तेव्हा आपण तिला किती "मिस' केलं. काहीतरी प्रॉब्लेम झाला असं सांगून मला फार चौकशीही करू दिली नाही. आत्ताही मी गेले पंधरा दिवस भेटण्याचा आग्रह धरल्यानंतर मोठ्या मुश्‍किलीने तयार झाली भेटायला. कधी एकदा पुणे गाठतो असं झालंय. 
विचारांच्या लयीत त्यानं आवरलं. धावत-पळत रेल्वे गाठली. गाडी हलली आणि पुन्हा एकदा भोवताल विसरून त्याच्या विचारांची फुले उमलू लागली. 
गेले सहा महिने आपण तिच्यासोबत फोनवरून बोलतोय. किती बोलते. आपलेपणानं चौकशी करते. आश्‍वासक बोलते. समजून सांगते. अनेक प्रश्‍नांची उकल पटकन्‌ करते. तिची वैचारिक प्रगल्भता जाणवत राहते. माझ्यापेक्षा तीच मला मॅच्युअर वाटते. रोज फोनवर बोलणं होतं. मग तिचा आवाज दिवसभर मनात किणकिणत राहतो. तिचा आवाज आपल्याला जाम आवडतो बुवा आणि...ती....? 
गाडी स्टेशनात शिरली आणि थांबतानाचा धक्का बसला तशी त्याची विचारांची तंद्री भंगली. स्टेशनमधून बाहेर येताच त्यानं रिक्षाला हात केला. "बालगंधर्व...' सांगत तो रिक्षात बसला... रिक्षा चालू पडली आणि याची विचारांची गाडीही सुटली सुसाट... 
...कशी असेल ती? कशी दिसेल ती?....काही वेळातच आपल्यासमोर तिचं सगुणसाकार रूप उभं राहील. आतापर्यंत फक्त आवाज ऐकून आपण तिला भेटायला एवढे आतूर झालो ती नेमकी कशी असेल...दिसायला सुंदर असेल की...?आणि सुंदर नसली तर...?छे, छे...ती सुंदरच असणार...एवढा गोड गळा आणि चेहरा कसलातरी कसा असेल...काही का असेना...जशी असेल तशी असेल...मैत्रीण आहे ती. मग दिसण-बिसणं फिजूल... 
...आयला पण उद्या तिला गाडीवरनं फिरवायचं म्हटलं तर... जरा तरी बरी असावी बुवा...हे....हे... हे... जशी असेल तशी घेऊन फिरू...आपली सख्खी मैत्रीण आहे हे महत्त्वाचे. भेटीच्या ओढीने...लागलेली हुरहूर त्याला दोन्ही बाजूंनी विचार करायला भाग पाडत होती. आता बास.. फार विचार नाही...जशी असेल तशी...ती आपली मैत्रीण...सखी! 
रेस्टॉरंट आलं... तो रिक्षातून उतरला. भेटायचं ठरलेल्या रेस्टॉरंटच्या पायऱ्या चढून आत जाताना धडधड वाढली. वाढत्या हार्टबिट्‌सना "ऑल इज वेल' समजावत तो आत गेला... त्याच्या भिरभिरत्या नजरेनं तिचा शोध सुरू केला. एका टेबलवर त्याची नजर स्थिरावली आणि त्याचा शोध बहुधा संपला. तो त्या टेबलजवळ जाऊ उभा राहिला... 
"मी...अमेय? तनया? 
"या नं बसा!' दोघीही म्हणाल्या. 
(हुश्‍श एक टेन्शन संपलं...दोघींपैकी कोणही असो. दोघीही दिसताहेत गोड..फाजील मनाचा कौल) 
तिघंही एकत्र बसूनही कमालीची शांतता. गर्दीतलं एकटेपण त्यानं अनुभवलं. मौनाला वाट मोकळी करून देत "काय घ्यायचं आपण?' त्यानं विचारलं. 
"काहीही' दोघीही बोलल्या. (किणकिणता आवाज आला; पण नेमका कोणाचा? पुन्हा त्याच्या डोक्‍यात प्रश्‍न) 
त्यानं वेटरला बोलावलं. काहीबाही ऑर्डर दिली. पुन्हा शांतता. 
तेवढ्यात दोघींपैकी एक उठली, "बराय, तनया मी येते जाऊन...तुम्ही बसा बोलत' असं म्हणत ती त्याच्याकडे पाहून हसली आणि जाऊ लागली. 
"अहो बसा हो...मिस...' 
तिनं काहीसं नाव सांगितलं. "आपण असेच न बोलता बसून राहायचं? एरव्ही फोनवर किती सुरेख बोलतेस आणि आज काय मौन व्रत, का मी भेटायला आलेलं आवडलं नाही तुला?. 
"नाही नाही तसं नाही...' तिचा किणकिणता आवाज कानावर पडला आणि दूरवर मंदिरात घंटा वाजल्याचा भास झाला. एवढ्यात वेटरने पदार्थ आणून ठेवले. पुन्हा संवाद बंद. फक्त काटेचमच्यांचा आवाज. ती मैत्रीणच काहीबाही विचारत होती आणि तो तिला उत्तरे देत राहिला. फोनवर अखंड बडबडणारी "तनया' त्यांना ऐकत होती गप्प राहून. 
न राहवून तो म्हणालाच 
"मला वाटतं मी आता निघावं!' 
त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मैत्रीण उठली, "चालू दे तुमचं!' मी आहे येथेच...'म्हणत ती बाहेर पडली. 
आता तो रिलॅक्‍स झाला. 
"खूप छान दिसतेस तू...पण आज काय बोलायची इच्छा नाही काय? आणि हे काय मला तुझ्या डोळ्यांत मला पाहायचंय. पाहायचंय माझ्या मैत्रिणीचे डोळे कसे आहेत ते?' 
ती काहीच बोलली नाही... 
"ओ बाईसाहेब, मी तुमच्याशी बोलतोय...' 
तिने गॉगल काढला. तिच्या दोन्ही डोळ्यांवर लावलेल्या पट्ट्या इतका वेळ गॉगलमुळे त्याला दिसल्या नव्हत्या. 
"हे काय? कशाने झालं हे?' 
ती सांगू लागली, ""महिनाभरापूर्वी ऑफिस सुटल्यानंतर बसमधून येत होते. कोणी तरी फुगा फेकून मारला. नेमका चेहऱ्यावर आदळला. त्यात कसलंतरी रसायनमिश्रित पाणी होतं. आग-आग झाली. मी ओरडले, किंचाळले. बेशुद्ध पडले. कोणीतरी मला दवाखान्यात नेलं. डॉक्‍टरांनी तपासणी केली. तातडीनं ऑपरेशन केलं...पण डोळ्यांविषयी खात्री नसल्याचं मला सांगितलं. अशा अवस्थेत मला तुला भेटायचं नव्हतं. तुला वाईट वाटेल म्हणून मी तुला टाळत होते. मित्र म्हणून तुला सांगायला हवं होतं, पण... 
तिला त्याची काहीच हालचाल ऐकू आली नाही..."अमेय...अमेय...' तिच्या हाकांना प्रतिसाद आलाच नाही.... 
तो हादरला...तिची कहाणी ऐकून तो बाहेर पडला...सगळा परिसर भोवताली फिरतोय असं त्याला वाटलं. सकाळपासून पाहिलेल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला...तिच्यासोबत सहजीवनाची पावले चालण्याचा विचारही संपला. ती दिसते गोड...आपल्याला शोभलीही असती...माझ्यासोबत सहजीवनाचं राहू दे पण, तिच्या आयुष्याचं काय? काल-परवापर्यंत बहुरंगी असलेलं तिचं आयुष्य एकदम काळवंडलं...तिच्या आयुष्यातले सगळे रंग उडून गेले एका क्षणात. ज्या हरामखोराने फुगा मारला त्याला कल्पनासुद्धा नसेल किती भयानक परिणाम भोगावा लागतोय एका जीवाला. डोळे बरे होईपर्यंत तिला काम नाही. नंतरचं माहीत नाही. आता फक्त नरकयातना. नियती...नियती म्हणतात ती हीच का? परमेश्‍वराऽऽऽ. तो तेथेच कट्ट्यावर बसून राहिला अस्वस्थ, असहाय्य...... 
काही वेळ गेला. मैत्रिणीसोबत तनया रेस्टॉरंटमधून बाहेर पडली. बससाठी रस्ता ओलांडला. समोर कट्ट्यावर अमेय. दोघींना पाहून तो समोर आला. त्याला पाहून मैत्रीण सटकली. काही बोलण्यापूर्वी अमेयनं तनयाचा हात हातात घेतला. 
"कोण...कोण आहे?' 
"मीच आहे अमेय... तू जशी आहेस तशी मला मैत्रीण म्हणून हवी आहेस...माझी मैत्री तुला आवडेल? असं म्हणत त्यानं गिफ्ट म्हणून आणलेली अंगठी तिच्या हातात ठेवली. 
-- 
त्याच्या या कृतीने पट्ट्यांआड तनयाचे डोळे पाणावले...आणि मैत्रिणीच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद आणि अश्रू चमकून उठले.